कातरवेळी..

कातरवेळी जेव्हा तुझ्या आठवणी मनी दाटू लागतात,
माझ्याच सावल्या मग मला छेडू लागतात..
रातराणीचा गंध मनोहर,
तुझाच आभास दरवळावा जसा..
वारा शीळ घाली अशी,
तुझाच आवाज कानी पडावा..
तुळशीपाशी ज्योत फर-फरे,
माझ्या मनीची तग-मग होई..
तुला पाहण्या काळीज माझे सैर-भैर धाव घेई..
विरहात तुझ्या असह्य वेदना,
सरी होऊन डोळ्यातून कोसळू लागतात..
कातरवेळी..
तुझ्या आठवणी..
मनी दाटू लागतात..
माझ्याच सावल्या मग मला छेडू लागतात..

निशब्द रात्री..

निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात,
मनातल पुन्हा नव्यानी सांगू लागतात,
मनात दडलेली गुपित,
एकट्यानीच रचलेले मनसुबे,
स्वप्नात बनवलेले इमले, पुन्हा दिसू लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..

कधी एकट्यानीच केलेली पायपीट,
कधी स्वतःशीच केलेली हितगुज,
स्वतःच स्वतः विरुद्ध मांडलेल्या बुद्धिबळात,
प्यादी मात देऊ लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..

आयुष्याची मांडलेली गणित,
फिसकटलेले आपलेच डाव,
सुख-दुखाचे हिशोब नकळत चुकू लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..

एकदा असाच..


नुकतच College संपल. आता कायमची सुट्टी! एक वेगळंच समाधान वाटत होतं. उद्या घरी जायला निघायचा म्हणून काय काय shopping & packing करायची ह्या विचारात रात्री केव्हा झोप लागली कळलंच नाही.
सकाळ झाली.. आज खर तर घरी जायचं म्हणून मी खूप खुश व्हायला हव होतं पण तरी एक रितेपणा जाणवत होता. काय झाला होता? ह्या विचारात मी घरातून बाहेर पडले.
बाहेर एक सुरेख सकाळ हळू हळू उमलत होती. सूर्य अलवार आकाशात डोकावत होता.. उंचच उंच वाढलेल्या माडाच्या झाडावर सोनेरी किरण पसरत होती.











पारिजातकाचा सडा पडलेला होता. लहान नाजूक फुलं ती...जपुन चालतानाही काही फुलं पायाखाली कोमेजलीच!
पलीकडच्या वळणावर बुचाची फुलं रस्ताभर विखुरली होती.. परसातली बुचाची पडणारी फुलं झेलण्याचा तो लहानपणीचा उद्योग आठवून हसू आल..
नेहमीच्या वाटेनी मी पुढे चालत जात होते. हळूहळू मन आठवणींची कवाड उघडून भूतकाळात उतरत होतं. नेहमीच्याच त्या चहाच्या टपरीवर नेहमीचीच वर्दळ. काही जण गरमा-गरम चहाचे भूरके घेत कालच्या क्रिकेटच्या सामान्यबद्दल चर्चा करत होते.. नुकताच, रोजचा morning walk संपवून आलेले गृहस्थ काखेतल वर्तमान पत्र सांभाळत, दुसरया हातातला चहाचा गरम पेला तोलत भ्रष्टाचारावर आपलं मत तावातावाने मांडत होते तर office ला वेळेत पोह्चायच्या घाईत एक तरुण गडबडीत चहा संपवत होता.. माझा चहा संपवून मीही निघाले.
रोज हे सगळं असच असतं..पण मग आज एक अनामिक हूर-हूर का?
परतीच्या वाटेवर हे कोड हळू-हळू उलगडू लागलं..
'ये चल उठ आत्ता' असा म्हणून मला रोज सकाळी उठवणारी माझी Dear Roomie आज नव्हती.. रोज कामाला जाण्याआधी प्राजक्ताची फुलं अलगद उचलून सजवणारी ती विद्या कालच तिच्या गावी गेली होती.. माडाच्या झाडावर अलवार पसरणाऱ्या सोनेरी किरणांना आपल्या क्यामेरयात टिपणारा राज आज नव्हता..गप्पात रंग भरणारा गट्टू, खळ-खळून हसणारी धनु, नेहमी उशिराने येणारा दीप..कुणी कुणी आज नव्हत.. चहाच्या टपरीवरच्या वर्दळीत मी आज एकटीच होते..
बुचाच्या फुलांनी दिलेल्या आठवणीने गहिवरून आलेला मन मोकळा करायला आज ह्यातला कुणी सोबत नव्हत..पण खरच का त्यांच्या नसण्यानी इतका फरक पडतो???
त्या फुलानाही का आज हे रितेपण जाणवत असावं? किरणांना का त्या एकट वाटत नसाव?
आज सगळ्या गप्पा शांत होत्या..आणि आठवणी पण एकट्या होत्या..
पण म्हणून का फुलं उमलायची थांबली नाहीत न किरणांनी उजळण सोडून दिलंय..
आठवणी पण अलगद डोकावतच होत्या..आमच्या नाहीत पण कुणाच्या तरी गप्पा रंगतच होत्या..
माझ्या उदास चेहर्यावर पुन्हा हसू उमलत होता.. आणि IPOD वर नुकतच गान बदलल होतं..
'जिंदगी कैसी हे पहेली हाये,कभी तो हसाये..कभी ये रूलाये..'

संभ्रम

डोक्यावर कुणीतरी घणाचे जोरदार घाव घालत आहे असं वाटत होत,
चोहीकडून प्रश्नांचा भडीमार होत होता,
कुणाचे प्रश्न? कोणते प्रश्न?
मी मलाच केलेले, माझेच प्रश्न..
भंडावून सोडतात ते मला,
मी मग वेड्याप्रमाणे त्यांची उत्तरं शोधत हिंडू लागते,
पण उत्तरं सापडतच नाहीत..
जिथे-जिथे आशेची किरण शलाका चमकून गेली तो प्रत्येक कोपरा मी चाचपून पाहीला..
पण संभ्रमाच्या ह्या गर्तेतून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नव्हता..
फक्त घणाचे घाव वाढत जात होते, मनातल्या वाढत्या प्रश्नान बरोबर..
अन..हाती काहीच लागत नाही..

एकटीच..


मला जपणाऱ्या माझ्या माणसांच्या गराड्यात पण मला एकता वाटत,
वेडं मन माझा तुलाच कुठे तरी शोधत राहत..
आईच्या कुशीत तुझ्या मिठीची उब शोधून पाहीली,
पप्पांच्या नजरेत तुझी ओढ शोधून पाहीली..
मित्रांचे विनोद आज मला पाहून हसू लागलेत,
मी हसले कि सखी चे डोळे नकळत भिजू लागलेत..
माझ्या माणसांच्या असण्यात तुझा नसणं जाणवत नाही असा नाही,
नवीन आयुष्य जगताना तुझ्या आठवणींना नको म्हटलं तरी मिटवता येत नाही..
पण..
तुझं नसणं खरं तर तुझ्या असण्याहून आणि सुखद वाटत ,
आठवणीत निदान चांगला-वाईट माझा मला ठरवता येतं..

एका रात्री..

काल उशिरा पर्यंत झोपच येत नव्हती.. सहज एक कविता खरडली आणि सगळ्यांना fwd केली.
एका friend चा reply आला , 'झोपली नाहीस अजून ?'
मी हि सहज उपहासात त्याला म्हटला कि 'नाही .. तारे मोजतेय..'
तर त्यांनीही म्हटलं, 'टीम-टीम नारेच मोज ..' :P.
तो कदाचित sms करून झोपी गेला असेल.. पण मी.. ???

मी सहज खिडकीतून आकाशकडे डोकावून पाहिलं..
आज आभाळहि दाटून आलेलं होत..
काल उशिरा पर्यंत झोपच  येत नव्हती..
खरा सांगू तर तुझी खूप खूप आठवण येत होती.
म्हटलं निदान टीम-टीम त्या ताऱ्यात तुला पाहावं पण आकाशालाहि काळ्या ढगांनी गवसणी घातली होती.
माझ्याच डोळ्यांत दोन तारे लख्खा चमकून गेले.
आणि ह्याच काळ्या आभाळाखाली
तुही त्या खिडकीपाशी
निजला असशील असे मी मनाला
खोटेच समजावले ...