आज तुझ्याशी बोलताना.... त्या साऱ्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
काहीच बदललं नाही आपल्यात, आपल्या नात्याशिवाय..!
आजही तू तसाच आहेस शांत, अविचल, तुझ्याचं जगात रमणारा.. स्वतःच्याच स्वप्नात हरवलेला.. तरीही आवर्जून आपल्या माणसाना जपणारा.. आणि मी...??? मी हि तर तशीचं आहे अजून..
कधी कधी वाटत काय चुकलं? कुणाच चुकलं?
जाऊ दे ना.. आजही आपल त्यावर एकमत होणार नाही...
आजही तेच संवाद....सवयीतले तेच शब्द...खूप बोलायचं असूनही न बोललं गेलेलं खूप काही आत आजही तसच खदखदत आहे पण मी बोलले नाही आणि तुही विचारलं नाहीस...
तरी आवर्जून मी म्हणालेच...'काही गोष्टी कधीच बदलत नाहीत'... त्यावर तुही म्हणालास 'कितीही प्रयत्न केला तरी...' पण मग ते नातंच नेमकं कस बदललं रे...?
निघून गेलास तू काहीच न बोलता...परत फिरून बोललाही नाहीस कधी मी बोले तोवर...
दिवसा मागून दिवस आणि वर्ष सुद्धा संपलीत अरे... पण आज...का कुणास ठाऊक सारख वाटत होत...
खरच काही गोष्टी कधीच बदलत नाहीत....
हो ना?
(असंच कधी तरी काहीतरी सुचत आणि न चुकता मी आवर्जून त्यासोबत लिहिते 'ह्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही...' हे माहिती असताना कि तू कुठे तरी वाचून मिश्कील हसत असणार...हो ना?)