"मस्तवाल मित्र"


आयुष्यात एका सायंकाळी अचानक येतो एक "मस्तवाल मित्र"..! 
त्याच आपलं वेगळंच विश्व..!
स्वतःमधेच रमणारा..हसणारा अन हसवणारा…!
‘सगळ आयुष्य बदलून गेलंय’ अस असं म्हटलं तर नाटकी वाटेल, पण खूप काही नक्कीच हळू-हळू बदलू लागतं.
नेहमीच कामात गुंतून राहणाऱ्या आपल्याला सायंकाळच्या चहाची हटकून आठवण करून देणारा तो म्हणजे----
रागात विनाकारण वैतागायला हक्काचा माणूस..!
हवं तेव्हा रडून मन मोकळं करायला भक्कम आधार..!
कधी भल्या पहाटे उठून सूर्योदय पहायला वेडी सोबत तर कधी एका सायंकाळी त्याच टेकडीवर तासन तास संवाद साधणारा मुका सोबती..!
आपल्या सारखाच वेडी स्वप्ने पाहणारा… आपल्या वेड्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा.. 
असा एक "मस्तवाल मित्र"..!
मग काय?
'दुनिया कि भीडसे  से दूर..हैराण..परेशान…' असणाऱ्या आपल्याला पुन्हा एकदा स्वतःच्या स्वप्नांवर.. स्वतःवर विश्वास वाटूलागतो.. पुन्हा नव्यानि काही स्वप्नं रंगवली जातात..  नव्या दमाने बेत आखले जातात.. अन कामाला सुरुवातही होते..
असा तो आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधीतरी कुठे तरी येतोच… जगण्याच्या घाईत म्हणा अगर गत-काळाच्या चुकांमुळेम्हणाआपण त्याच्याकडे खुपदा दुर्लक्षच करतो.. तो हळूच येतो… खुपदा आपल्या नकळत आपल्यासाठी थांबतो.. गरज असते ती फक्त क्षणभर थांबून त्याचाशी हाथ मिळवायची…! मग काय Life मस्तचं होऊन जाते..अगदी आपल्या मस्तवाल मित्र सारखीच!