"मस्तवाल मित्र"


आयुष्यात एका सायंकाळी अचानक येतो एक "मस्तवाल मित्र"..! 
त्याच आपलं वेगळंच विश्व..!
स्वतःमधेच रमणारा..हसणारा अन हसवणारा…!
‘सगळ आयुष्य बदलून गेलंय’ अस असं म्हटलं तर नाटकी वाटेल, पण खूप काही नक्कीच हळू-हळू बदलू लागतं.
नेहमीच कामात गुंतून राहणाऱ्या आपल्याला सायंकाळच्या चहाची हटकून आठवण करून देणारा तो म्हणजे----
रागात विनाकारण वैतागायला हक्काचा माणूस..!
हवं तेव्हा रडून मन मोकळं करायला भक्कम आधार..!
कधी भल्या पहाटे उठून सूर्योदय पहायला वेडी सोबत तर कधी एका सायंकाळी त्याच टेकडीवर तासन तास संवाद साधणारा मुका सोबती..!
आपल्या सारखाच वेडी स्वप्ने पाहणारा… आपल्या वेड्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा.. 
असा एक "मस्तवाल मित्र"..!
मग काय?
'दुनिया कि भीडसे  से दूर..हैराण..परेशान…' असणाऱ्या आपल्याला पुन्हा एकदा स्वतःच्या स्वप्नांवर.. स्वतःवर विश्वास वाटूलागतो.. पुन्हा नव्यानि काही स्वप्नं रंगवली जातात..  नव्या दमाने बेत आखले जातात.. अन कामाला सुरुवातही होते..
असा तो आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधीतरी कुठे तरी येतोच… जगण्याच्या घाईत म्हणा अगर गत-काळाच्या चुकांमुळेम्हणाआपण त्याच्याकडे खुपदा दुर्लक्षच करतो.. तो हळूच येतो… खुपदा आपल्या नकळत आपल्यासाठी थांबतो.. गरज असते ती फक्त क्षणभर थांबून त्याचाशी हाथ मिळवायची…! मग काय Life मस्तचं होऊन जाते..अगदी आपल्या मस्तवाल मित्र सारखीच!

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. आयुष्यातील मित्र हा आपल्या अवघड अशा गणितातला एक हच्चा असतो त्याला मिळवलं कि गणित रुपी आयुष्याची उकल व्हायला सुरुवात होते आणि त्याला बाजूला सारल कि सारच चुकत जात...म्हणून तुझा हा मस्तवाल मित्र म्हणजे तुझीच एक प्रतिकृती आहे कारण आपला जो विचार असतो त्याचाच परिपाक आपण कुणा एकात किंवा एकीत शोधात असतो. मग आपल्या भावनिक आंदोलकांचा आवेग जोरात असतो त्यावेळी आपल्याला आपल्याच मनाच्या पटलात कोरलेल्या किंबहुना काही अनशी दबलेल्या व्यक्तित्वाचा शोध व्हायला लागतो .....!!!!!
    अशा वेळी काही कवितेच्या ओळी आठवत आहेत ज्या आपल्याला आयुष्याच्या सत्यात घेऊन जातात.... http://1.bp.blogspot.com/-04A9lpdZB98/T3Gf2u9eX2I/AAAAAAAAGJ4/x767bC0c6Dg/s1600/grace.jpg

    ReplyDelete